Posts

Showing posts from June, 2022

पंढरीचे वारकरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*

Image
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *पंढरीचे वारकरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*   🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸                      महाराष्ट्रात वारकरी सांप्रदाय हा अनादी कालापासून चालत आलेला सांप्रदाय आहे.या वारकरी सांप्रदायातच संत ज्ञानेश्वर महाराजांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत पुष्कळसे संत होऊन गेले. आणि त्याच वारकरी परंपरेतील विदर्भातील एक महान संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सुद्धा पंढरीचे वारकरी व वारकरी संतच होते. महापुरुष दुर्लभ असतो व आपण सामान्यपणे त्यांना ओळखू शकत नाही.खरा सत्पुरुष आत्मप्रौढी पासून दूर असतो आणि प्रसिद्धी परान्मुख असतो.आपले तप,ज्ञान,अध्यात्मानुभव यांचा वाजागाजा करीत नाहीत.म्हणूनच त्यांचे विचार सामान्यांना एकदम समजत नाहीत.म्हणूनच राष्ट्रसंत वारकरी संत असूनही ते सामान्य जनांना समजलेच नाहीत.वारकऱ्यांची मुख्य लक्षणे कोणती याचा प्रथम विचार करू. *वारकऱ्यांची मुख्य लक्षणे* :- १)वारकऱ्यांचे दैवत श्री विठ्ठल. २)पंढरपूरची नित्यनेम वारी. ३)तुळशीची माळ गळ्यात घालणे व गोपीचंदन लावणे. ४)एकादशी...

पावसावरील कविता

Image
*पावसाकडे प्रत्येक कवी कसा वेगवेगळ्या सुंदर नजरेने पाहतो* *आणि कविता प्रत्येक पिढीनुसार* *कशी तरुण होते पहा……* ( अर्थात तुलना करणे  असा हेतू अजिबात नाहीये.. ) नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी : घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली; नको नाचू तडातडा असा कौलारावरून : तांबे-सतेली-पातेली आणू भांडी मी कोठून?                    *इंदिरा संत*  कालचा पाऊस आमच्या  गावात आलाच नाही, आम्ही आसवांनी शेते भिजवली..                              *यशवंत मनोहर* ए आई मला पावसात  जाऊ दे । एकदाच ग भिजुनी  मला चिंब चिंब होऊ दे ।। मेघ कसे बघ  गडगड करिती । विजा नभांतुन  मला खुणविती । त्यांच्यासंगे अंगणात मज  खूप खूप नाचु दे ।।                      *वंदना विटणकर*   नभं उतरू आलं,  चिंब थरथर वलं । अंग झिम्माड झालं,  हिरव्या बहरात ।। अशा वलंस राती,  गळा शपथा येती । स...

लेकीसाठी वैकुंठातुन

Image
*लेकीसाठी वैकुंठातुन*👨‍👧                   -----------------------------------          भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुकाराम महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. नित्याप्रमाणे पांडुरंगाचं नामजप करत स्नान करून विठ्ठलाची पुजा झाली.तुळसीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असताना जिजाबाईने जोरानं हाक दिली.      काही काळजी आहे का संसाराची?पोरींची?तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे. महाराज शांतपणे म्हणाले,आवले योग्य वेळ आल्यावर सर्व काही व्यवस्थित होत.योग्य वेळ येवू द्यावी लागते.परंतु जिजाबाईची नेहमीची कटकट ऐकून महाराज एकदिवशी जवळच यलवडी नावाचं गाव होतं. तिथे मुलगा पाहण्यासाठी गेले.तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहुन त्यांना खुप आनंद झाला. आणि महाराजांची मुलगी भागिरथी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा आपल जिवन परिपूर्ण झालं, संतकुळातली मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना अत्त्यानंद झाला.       अखेर लग्न झालं.भागिरथी महाराजांच्या गळ्यात पडून ...

वि दा सावरकर

Image
वि दा सावरकर  *ने मजसी ने परत मातृभूमीला*  *सागरा प्राण तळमळला.* *सागरा..........*..   भारत माते वर प्राणाहुन अधीक प्रेम करणारे वि दा सावरकर....  ब्रायटन येथे अभिनव भारत या संस्थेवर जेव्हा  इंग्रजांनी वक्र दृष्टी टाकली  त्यामुळे आपणास आता  परत मातृभूमीला येता येणार नाही हे जेव्हा समजले तेव्हा सावरकरांना  काव्य स्फुरले  आणि त्यांचा प्राण तळमळला...  *नभी  नक्षत्रे बहुत परी एक प्यारा*  *मज भारत भूमिचा तारा*  *प्रासाद इथे भव्य परी* *मज भारी आईची झोपडी प्यारी*  अशा शब्दातून त्यांना *सागरास* काव्य स्फुरले.  28 मे 1833 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी या क्रांतीचा लखलखता तारा उदयास आला. वेदशास्त्रसंपन्न घराण्यात जन्म.  त्यामुळे आहार-विहार,  आरोग्य संपदा त्यावर आपोआपच प्रेम जडलेले सावरकर लहानपणापासूनच खूप हुशार. वयाच्या 13-14 व्या   वर्षापासूनच ते काव्यही करू लागले. जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत बाल्यावस्था. तारुण्यावस्था, वार्धक्य यात सावरकर एक  झुंजार वीर पुरुष म्हणूनच राहिले...

कर्माचा - सिद्धांत

Image
कर्माचा - सिद्धांत                   *कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.* काही लोकांना नाही पटणार हा विषय,  पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल,!! .... अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ... जसे की   1) शारिरीक, मानसिक, आर्थिक,... 2) अपमानास्पद वागणुक,... 3) कोणांचे मन दुखावले असू शकते,...                      4) कोणावर अन्याय केला गेलेला असतो,... 5) कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,..... 6) *छळ केलेला असेल,.....* 7) कोणाची हक्काची फसवून प्रॉपर्टी हडपली असेल..... 8) कोणाला अनिती करायला बळ दिल असेल...... 9) शारिरीक दुखापत केलेली असेल, ....... 10)  विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल......                                        11) ज्याने उपकार केले असतील आणि स्वा...

🌹खाजगी शाळेत मुलांना शिकविणे एक मानसिकता🌹

Image
🌹 खाजगी शाळेत मुलांना शिकविणे एक मानसिकता🌹 एकेकाळी जातीभेद होता परंतु आजच्या काळात श्रीमंत व गरीब असा जातीभेद तयार झालेला आहे.म्हणून पालकांची अशी धारणा झाली आहे की जि.प.शाळेत गरीबांची मुले शिकतात तर मग आपला मुलगा/मुलगी त्या गरीब मुलांबरोबर राहून बिघडेेल या शंकेने काही पालक आपल्या पाल्यांना सरकारी शाळेत शिकवत नाहीत परंतु जोपर्यंत सरकारी शाळा अस्तित्वात आहेत तोपर्यंत या शाळेंचे महत्त्व आपल्याला कळणार नाही आणि ज्यादिवशी *सरकारी शाळा बंद पडतील तेव्हा आपल्याला या शाळेंचे महत्त्व कळेल कारण या सरकारी शाळा बंद पडतील तेव्हा खाजगी शाळांचे खरे रौद्ररूप आपल्यासमोर दिसेल, पूर्वजांनी एक म्हण लावून ठेवली आहे की " *सवत ही असलीच पाहिजे* " कारण सरकारी शाळा बंद पडल्यानंतर भविष्यात खाजगी शाळा पालकांकडून प्रवेश फी च्या नावाखाली खंडणी वसूल करतीलच त्याबरोबर दुकानदारी म्हणून कपडे,वह्या,जर्नल,पेन, वॉटरबॅग,दप्तर असे सर्व शैक्षणिक साहित्य सुध्दा शाळेच्या दुकानातूनच विध्यार्थ्यांनी घ्याव्यात असे बंधन टाकतील यात तिळमात्र शंका नाही. *शिक्षणसम्राट शिक्षणाच्या नावाखाली अक्षरशःखंडणी वसुल करतील ...

कर्मवीर भाऊराव पाटील :

Image
कर्मवीर भाऊराव पाटील : शिक्षणासाठी संपुर्ण आयुष्य समर्पित करणारे त्यागी,निःस्वार्थी, दयाळू,स्वाभिमानी शिक्षणमहर्षी -----------------------------  --डॉ.श्रीमंत कोकाटे -----------------------------                         "रयत" हा शब्द मराठी संस्कृतीच्या जिव्हाळ्याचा शब्द आहे. मूळ अरबी भाषेतील असणाऱ्या शब्दाने मराठी भाषिकांना आकर्षित केले आहे. रयत म्हटले की एक आपुलकीची भावना मराठी भाषिकांच्या मनात निर्माण होते. कारण छत्रपती शिवाजीराजांनी जे राज्य निर्माण केले, त्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले जाते. रयत म्हणजे सर्व जनता! त्यामध्ये भेदभाव नाही.  कर्मवीर भाऊराव पाटील :                            छत्रपती शिवाजीराजांनी कृषी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये समतेचा पाया घातला. तीच परंपरा शैक्षणिक क्षेत्रामध्ये 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू ठेवली.         ...